Posts

Showing posts from May, 2019

पुस्तक आणि आपण

 पुस्तकाशी मैत्री म्हणजे सुवर्ण योगच म्हणाव लागेल.पुस्तक आपल्याला वेगळया दुनियेत घेऊन जातात.आपल मन खूप हलकं होतं.पुस्तक न बोलता आपल्याला समजून घेतात.खरचं हे शक्य आहे का?न बोलता आपलं मन जाणणं किती अवघड आहे पण पुस्तक हे करु शकतात.पुस्तकांशीमैत्री म्हणजे पूर्ण जगाशी मैत्री.पुस्तक आपल्याला आख्या जगात फिरुन आणू शकतात.नवनवीन माहिती आपल्याला पुस्तकामुळेच समजते.जो पुस्तकाशी मैत्री करेल तो जीवनात कधीही दु:की राहू शकत नाही.

आई आणि मुलगी

आई आणि मुलींचे नातं वेगळेच असते. मुलीच्या आवाजावरून आईला समजते की मुलीला कशाची गरज आहे. त्यामुळे दोघींचे नाते घट्ट होत जाते.मुलगी नेहमी आईचीच बाजू घेते.आई मनातून खूप सुखावते.आई पण मुलीला काही कमी पडू देत नाही.तिचा सर्व हट्ट पुरवण्याचा प्रयत्न करते.हळूहळू हे दृश्य बदलते.जसजसे आईचे वय वाढते मग मुलगी आई बनते.ती आईचे हट्ट पुरवणारा सुरुवात करते.त्यावेळी आईचे डोळे पाणावतात.हिच का माझं बाळुत्यातील बाळ. खरंच किती मोठी झाली आणि आईचे जीवन कृतकृत्य होते.

ए. पी.जे.अब्दुल कलाम

ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी सगळे पुस्तक वाचनीय व प्रेरणा देणारे लिहिलेले आहे.त्याचे 'अग्नीपंख'हे पुस्तक तरुण मुला_मुलीसाठी खूपच ऊर्जा देणारे आहे.मला तर असे वाटते की सर्व जण  हे पुस्तक वाचावे.त्यातील एक वाक्य खूपच सुंदर लिहिलंय आहे.' कधीही कामाला आपल्या पेक्षा मोठे होऊ द्यायचे नाही.' असे वाक्य आपल्या जीवनात आचरणात आणल्यास खरंच सकारात्मक ऊर्जा मिळते. आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. जीवन सोपे वाटायला लागते. त्यावेळेस समजते की शब्दांमध्ये किती ताकद आहे.आपण स्वत़ आतून कणखर होत जातो.अशा वेळी कोणाकडून ही जास्त अपेक्षा करायची इच्छा होत नाही.त्यामुळे अपेक्षा भंग पण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आपले मन निर्मळ होते.आपण आऩंदी जीवन जगण्याला सुरुवात करतो.